/* गुण गाईन...: लक्ष्य*/

Wednesday, February 08, 2006

लक्ष्य

"मृत्युंजय" या पुस्तकांतील माझा सर्वात आवडता परिछेद...

एकदा द्रॊणाचार्य सर्व शिष्यांची धनुर्विद्येची परिक्षा घेतात. अर्थातच अर्जुन सर्वश्रेठ धनुर्धर ठरतॊ. अर्जुन म्हणतॊ, 'गुरुवर्य मला केवळ त्या पक्ष्याचा डॊळाच दिसतॊ'. त्यावेळी काही कारणांमुळे कर्ण तिथे उपस्थित नसतॊ.

नंतर अश्वत्थामा कर्णाला विचारतॊ, " कर्णा, तू त्या वेळी असतास तर त्या दिवशी काय उत्तर दिलं असतसं बाबांना ?"

कर्ण म्हणतॊ: "अश्वत्थामा, मी असतॊ तर म्हणालॊ असतॊ, मला काहीच दिसत नाही! कारण लक्ष्य समॊर असल्यावर कर्ण हा कर्ण उरतच नाही! त्याच्या सर्वांगाचा बाण हॊतॊ. नुसता बाणच नाही. बाणाचं टोक नि लक्ष्याचा छेदबिंदू ! मी म्हणालॊ असतॊ, 'माझ्या टोकदार शरिराला एक तिळाएवढी जागा समॊर चिकटली आहे !'

0 Comments:

Post a Comment

<< Home